चहाच्या टपरीवर नुकतीच कानी पडलेली एक चर्चा :
"ओबामा घरी जाण्यासाठी इथुन निघताना आंघोळ करुन निघाले असतील का रे?"
"अर्थातच"
"आंघोळ नाही रे, त्याला शॊवर घेणे म्हणतात."
"तेच ते रे!"
"नाही. नुसतेच ड्राय क्लिनिंग केले असेल"
"मग ते आंघोळीनंतर कपड्यांचे काय करत असतील?"
"म्हणजे?"
"म्हणजे स्वत:चे कपडे स्वत:च धुवत असतील का?"
"येडा की काय? ताजची स्वत:ची लॊंडरी असेल की?"
"त्यांचे कपडे ताजमधला भय्या थोडाच धुवेल? त्यांच्याबरोबरच तिकडचा धोबीसुध्धा आला असेल."
"हो.नाहीतर भय्या कपड्यात खाजकुयली टाकायचा."
"खाजकुयलीला हिंदीमधे काय म्हणतात बरं?"
"ओबामीण बाई एकदम साध्या वाटतात. ओबाम्याचे आणि त्यांचे निदान आतले कपडे तरी त्या स्वत:च धुवत असतील."
"नाही रे. ती काही झालं तरी अमेरीकन बाई. त्यात फर्स्ट लेडी, ओबामांना ती त्यांचे कपडे स्वत:लाच धुवायला लावत असेल."
"छट. त्यां दोघांच्या कपड्यांचे पेपर श्रेडर मधे तुकडे तुकडे करत असतील."
"जाळुन टाकत असतील"
"हो. नाहीतर त्या कपड्यांचा लिलाव व्हायचा."
"तुकडे करुन शिवाय जाळत असतील"
"ते सकाळी निघाले म्हणजे ओले कपडे प्लास्टीकच्या पिशवीतुन नेले असतीलच."
"विमानाच्या खिडकीत वाळत टाकतील. म्हणजे व्हाईट हाउस यीईपर्यंत खडखडीत वाळतील."
"अरे लेका, खिडकी उघडी असायला ती काय तुला रत्न्नांग्रीची येस्टी वाटली होय?"
"मी सांगतो, विमानात एखादी दोरी बांधत असतील कपडे वाळत घालायला.
.....
(चहा आल्यामुळे ही मौलिक चर्चा इकडेच थांबली.)
Thursday, November 11, 2010
Sunday, September 5, 2010
गोविंदा
परवाच्या दिवशी जन्माष्टमीचा सण सर्वत्र मोठया उत्साहात साजरा झाला.मुंबई व आसपासच्या परिसरात साजरा होणारा "गोविंदा" सर्व चित्रवाहीन्या आवर्जुन दाखवत होत्या. कृष्णजन्माचा हा सण असाच उत्साहाने साजरा व्हावा, उंच उंच टांगलेल्या ह्ंड्या तरुणाईने असाच जल्लोष करत फोडाव्यात याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. किंबहुना अशा उतु जाणाऱ्या उत्साहाने सण साजरे करणे हे भारतीयांचे वैशिष्ठच आहे.
तरीही दरवर्षी या सणाच्या निमित्ताने पडणारे काही प्रश्ण यावर्षीही पडले. ब्लॊगचे माध्यम हाताशी असल्यामुळे हे प्रश्ण जमतील तितक्या लोकांपर्यंत पोचवावेत यासाठी हा लेखनप्रपंच.
दरवर्षीसारख्याच यावर्षीही काही गोविंदा जखमी झाल्याच्या बातम्या कानावर आल्या आणि मन अस्वस्थ करुन गेल्या. यांपैकी एका गोविंदाचा मृत्यु झाल्याचे वृत्त नुकतेच दुरचित्रवाणीवर दाखवले. मला असे वाटते की या उत्सवात एका जरी व्यक्तीचा मृत्यु झाला, एकजण ज्ररी कायमचा अपंग झाला तरी ते फारच लांछनास्पद आहे. "उत्सवाला गालबोट लागले" हा फारच सौम्य शब्दप्रयोग झाला.
आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व टाळण्यासाठी अनेक साधेसोपे उपाय असताना ते वापरले का बरे जात नाहीत? मला सुचणारे काही उपाय असे आहेत:
१) गोविंदांचा मानवी मनोरा जेथे रचला जातो त्यापासुन चारपाच मीटर्सचा परिसर मोकळा ठेवणे. यामुळे रेटारेटी होणार नाही.
२) या मोकळ्या परिघात सर्कसमधे जसे वापरले जाते तसे सुरक्षा जाळे लावले तर उंचावरुन पडणारे गोविंदा अलगद या जाळ्यात पडतील.
३) मनोरा रचण्यापुर्वी सर्व गोविंदांना कोरडे करुन घ्यावे. हातपाय निसटल्यामुळे होणारे अपघात यामुळे टळू शकतील.
4) मनोरा रचताना चहुबाजूंनी zoom lense वापरुन चित्रीकरण करावे. यामुळे चुकांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल.
५) गोविंदा पथकांसाठी पोलिसांनी एक नियमावली बनवावी व तिची काटेकोर अंमलबजावणी करावी.
गोविंदा पथकातली बहुसंख्य मुले ही निम्न मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातली असतात. विचार करा बरं. विशी-पंचविशीतला हातातोंडाशी आलेला युवक हा मृत्यूमुखी पडला वा अपंग झाला तर या कुटुंबांवर काय आपत्ती कोसळत असेल?
दरवर्षी थरांचे,हंडीच्या रकमेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. या वर्षी एकाही गोविंदाचा मृत्यु झाला नाही अथवा एकही गोविंदा जबर जखमी झाला नाही असा विक्रम कधी होणार?
भारतातल्या विविध देवस्थानांच्या ठिकाणी अनेकदा होणारी चेंगराचेंगरी, वारीच्या दिवसात पंढरपुरात पसरणारे घाणीचे साम्राज्य व फैलावणारे आजार हे असेच काही चिंतेचे विषय. काही देवस्थानांच्या भरुन वाहणाऱ्या तिजोऱ्यांच्या पार्श्वभुमीवर तर हे चित्र फारच विदारक दिसते.
तरीही दरवर्षी या सणाच्या निमित्ताने पडणारे काही प्रश्ण यावर्षीही पडले. ब्लॊगचे माध्यम हाताशी असल्यामुळे हे प्रश्ण जमतील तितक्या लोकांपर्यंत पोचवावेत यासाठी हा लेखनप्रपंच.
दरवर्षीसारख्याच यावर्षीही काही गोविंदा जखमी झाल्याच्या बातम्या कानावर आल्या आणि मन अस्वस्थ करुन गेल्या. यांपैकी एका गोविंदाचा मृत्यु झाल्याचे वृत्त नुकतेच दुरचित्रवाणीवर दाखवले. मला असे वाटते की या उत्सवात एका जरी व्यक्तीचा मृत्यु झाला, एकजण ज्ररी कायमचा अपंग झाला तरी ते फारच लांछनास्पद आहे. "उत्सवाला गालबोट लागले" हा फारच सौम्य शब्दप्रयोग झाला.
आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व टाळण्यासाठी अनेक साधेसोपे उपाय असताना ते वापरले का बरे जात नाहीत? मला सुचणारे काही उपाय असे आहेत:
१) गोविंदांचा मानवी मनोरा जेथे रचला जातो त्यापासुन चारपाच मीटर्सचा परिसर मोकळा ठेवणे. यामुळे रेटारेटी होणार नाही.
२) या मोकळ्या परिघात सर्कसमधे जसे वापरले जाते तसे सुरक्षा जाळे लावले तर उंचावरुन पडणारे गोविंदा अलगद या जाळ्यात पडतील.
३) मनोरा रचण्यापुर्वी सर्व गोविंदांना कोरडे करुन घ्यावे. हातपाय निसटल्यामुळे होणारे अपघात यामुळे टळू शकतील.
4) मनोरा रचताना चहुबाजूंनी zoom lense वापरुन चित्रीकरण करावे. यामुळे चुकांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल.
५) गोविंदा पथकांसाठी पोलिसांनी एक नियमावली बनवावी व तिची काटेकोर अंमलबजावणी करावी.
गोविंदा पथकातली बहुसंख्य मुले ही निम्न मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातली असतात. विचार करा बरं. विशी-पंचविशीतला हातातोंडाशी आलेला युवक हा मृत्यूमुखी पडला वा अपंग झाला तर या कुटुंबांवर काय आपत्ती कोसळत असेल?
दरवर्षी थरांचे,हंडीच्या रकमेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. या वर्षी एकाही गोविंदाचा मृत्यु झाला नाही अथवा एकही गोविंदा जबर जखमी झाला नाही असा विक्रम कधी होणार?
भारतातल्या विविध देवस्थानांच्या ठिकाणी अनेकदा होणारी चेंगराचेंगरी, वारीच्या दिवसात पंढरपुरात पसरणारे घाणीचे साम्राज्य व फैलावणारे आजार हे असेच काही चिंतेचे विषय. काही देवस्थानांच्या भरुन वाहणाऱ्या तिजोऱ्यांच्या पार्श्वभुमीवर तर हे चित्र फारच विदारक दिसते.
Thursday, September 25, 2008
Friday, June 13, 2008
वाघांचे फोटो
सुमात्रा (इंडोनेशिया)येथील वाघाचा बछडा.सध्या याला ऒस्ट्रेलियामधील एका प्राणिसंग्रहालयाने दत्तक घेतले आहे.
पांढरे बंगाली वाघ पाण्यात खेळताना.

डोळे हे जुल्मी गडे रोखुनी मज पाहु नका ;)!!!!

सांभाळा बरं का !!! आम्ही बच्चे असलो तरी वाघाचे आहोत म्हटलं !!

दुर्मिळ पांढरा बंगाली वाघ. साया जगात हे फक्त १०० च्या आसपास शिल्लक आहेत.

**@@@# %$) ^& ;) ;) :)

अतिशय दुर्मिळ स्नोव्हाइट वाघ(जर्मनी)

सुमात्रा य्रेथील मायलेक.

पाच वर्षांच्या या बंगाली वाघाने प्रशिक्षकाने पाण्यात टाकलेला मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी सूर मारला आहे.

वाघाची लांबी ५ फ़ूट ते ९ फूट असते.शिवाय़ दोन तीन फुटांची शेपटी वेगळीच.
ही सर्व छायाचित्रे howstuffworks.com वरुन घेतली आहेत.
Friday, May 30, 2008
चीनमधील भुकंप
चीनमधील सिचुआन परगण्याला १२ मे २००८ रोजी दुपारी २.२८ ला ८ रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंपाचा तीव्र धक्का बसला.भुकंपाचा केन्द्रबिंदू,चेंगुडु शहरापासुन ९० मैल अंतरावरील वेंचुआन येथे होता.
आज तीस मे रोजी हा ब्लॊग लिहितेवेळी मृतांची संख्या ७०,००० पयंत पोहोचली आहे.इमारती व घरे किती कोसळली याची तर काही गणनाच नाही. ह्या भुकंपातून बाहेर पडलेली उर्जा १९९५ मधे झालेल्या जपानमधील कोबे येथे झालेल्या भुकंपापेक्षा ३० पट जास्त होती.
भुकंपाच्या केंद्राजवळील शहरेच्या शहरे जमीनदोस्त झाली.
उभे पर्वत कोसळले.




लक्षावधी लोकांचे प्रियजन मृत्युमुखी पडले अथवा बेपत्ता झाले.
लक्षावधींची आयुष्याची मिळकत क्षणात मातीमोल झाली.
तरीही कोठेही लूटमार नाही की लोकांची काही तक्रार नाही.
जिकडे तिकडे दिसताहेत फ़क्त एकमेकांना मदत करणारे लोक.
काही तासांतच लोक मदतकार्याला लागले.रक्तदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या.चोवीस तासांच्या आत, सर्व प्रमुख रक्तपेढ्यांची साठवणक्षमता संपली.दुजियानयांग ह्या भुकंपाची सर्वाधिक झळ लागलेल्या शहराकडे जाणाया सर्व महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली.नाही!!! ही वाहतुक शहरातुन बाहेर पळणाया लोकांची नव्हती तर मदतीसाठी शहरात जाऊ इच्छींणाया स्वयंसेवकांची होती.यामधे लोकांच्या मदतीसाठी जाणाया १००० टॅक्सीचालकांचा समावेश होता.
चेन गौन्बियाओ या भुकंपग्रस्त भागापासून १५०० मैल अंतरावर असणाया बांधकामव्यावसायिकाची बांधकामाची यंत्रसामग्री अवघ्या अडीच तासात १२० स्वय़ंसेवकांसह चेंगडुकडे रवाना झाली.चोवीस तासातच, सैन्याच्या अभियांत्रीकी तुकडीबरोबरच ते भुकंपग्रस्त भागात पोहोचले.
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी अथक परिश्रम घेतले.कित्येक गर्भवती महीला पार्कीग लॊटमधेच प्रसुत झाल्या.
वेन जियाबाओ हे चीनचे ६६ वर्षीय पंतप्रधान घटनेनंतर अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी जाण्यासाठी विमानात बसले.आणि अवघ्या दोन तासात घटनास्थळी पोहोचले.
११,०० पॅरॅशूटधारींनी दोनतीन तासात घटनास्थळी उतराय़ला सुरुवात केली.पाऊस,वादळी वारा आणि ढग यांची पर्वा न करता त्यांनी दुर्गम पर्वतराजित उड्या मारल्या.
पहिली उडी मारली ती एक्कावन वर्षीय सिनियर कॊलोनेल ली झेनाबो यांनी.

खचलेली जमीन व खराब हवामान यामुळे जेव्हा हवाई मदत करणे अवघड झाले तेव्हा ५७ वर्षीय मेजर जनरल सिया गुओफ़ु यांच्या नेतृत्वाखाली ६०० जवान व वैद्यकीय मदतनीसांची टीम चालत निघाली.सिचुआन लष्करी विभागाचे मुख्य कमांडर जड ओझे घेऊन २१ तासांची पायपीट करुन पोहोचले.भुकंपाच्या केंद्रबिंदुपाशी पोहोचणारी ही पहिली तुकडी होती.



खचलेल्या रस्त्यांमुळे अवजड यन्त्रसामुग्री नेणे अवघड झाले.जवानांना हातानेच ढिगारे उपसून टनावारी कॊक्रीट हलवावे लागले.
लोक हिरिरीने द्रव्यदान करत आहेत.
भुकंपात घर गमावलेल्या सु चाओ याने ५ युआन देणगी दिली.तो म्हणतो,त्याच्यापेक्षा वाईट परीस्थिती असलेले आणखी कितीतरी लोक आहेत.
तीन वर्षीय सॊंग झिनीयींग हिला दोन दिवसांनंतर ढिगायाखालुन बाहेर काढण्यात आले.तीने एक पाय गमावला असला तरी तिच्या जिवाला काही धोका नाही.दुर्दैवाने तिचे पालक मात्र वाचू शकले नाहीत.
अकरा वर्षांचा झांग जिवांग हा आपल्या तीन वर्षांच्या झांग हान या बहिणीला घेऊन भुकंपाच्या केन्द्रबिंदुजवळुन बारा तास चालत आला.
ह्या चार पाच महिन्यांच्या बाळाला चोवीस तासांनी बाहेर काढण्यात आले.त्याच्या अंगावर साधा ओरखडाही नव्हता हा चमत्कारच.
आज तीस मे रोजी हा ब्लॊग लिहितेवेळी मृतांची संख्या ७०,००० पयंत पोहोचली आहे.इमारती व घरे किती कोसळली याची तर काही गणनाच नाही. ह्या भुकंपातून बाहेर पडलेली उर्जा १९९५ मधे झालेल्या जपानमधील कोबे येथे झालेल्या भुकंपापेक्षा ३० पट जास्त होती.
भुकंपाच्या केंद्राजवळील शहरेच्या शहरे जमीनदोस्त झाली.

उभे पर्वत कोसळले.




लक्षावधी लोकांचे प्रियजन मृत्युमुखी पडले अथवा बेपत्ता झाले.
लक्षावधींची आयुष्याची मिळकत क्षणात मातीमोल झाली.
तरीही कोठेही लूटमार नाही की लोकांची काही तक्रार नाही.
जिकडे तिकडे दिसताहेत फ़क्त एकमेकांना मदत करणारे लोक.
काही तासांतच लोक मदतकार्याला लागले.रक्तदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या.चोवीस तासांच्या आत, सर्व प्रमुख रक्तपेढ्यांची साठवणक्षमता संपली.दुजियानयांग ह्या भुकंपाची सर्वाधिक झळ लागलेल्या शहराकडे जाणाया सर्व महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली.नाही!!! ही वाहतुक शहरातुन बाहेर पळणाया लोकांची नव्हती तर मदतीसाठी शहरात जाऊ इच्छींणाया स्वयंसेवकांची होती.यामधे लोकांच्या मदतीसाठी जाणाया १००० टॅक्सीचालकांचा समावेश होता.
चेन गौन्बियाओ या भुकंपग्रस्त भागापासून १५०० मैल अंतरावर असणाया बांधकामव्यावसायिकाची बांधकामाची यंत्रसामग्री अवघ्या अडीच तासात १२० स्वय़ंसेवकांसह चेंगडुकडे रवाना झाली.चोवीस तासातच, सैन्याच्या अभियांत्रीकी तुकडीबरोबरच ते भुकंपग्रस्त भागात पोहोचले.
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी अथक परिश्रम घेतले.कित्येक गर्भवती महीला पार्कीग लॊटमधेच प्रसुत झाल्या.
वेन जियाबाओ हे चीनचे ६६ वर्षीय पंतप्रधान घटनेनंतर अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी जाण्यासाठी विमानात बसले.आणि अवघ्या दोन तासात घटनास्थळी पोहोचले.
११,०० पॅरॅशूटधारींनी दोनतीन तासात घटनास्थळी उतराय़ला सुरुवात केली.पाऊस,वादळी वारा आणि ढग यांची पर्वा न करता त्यांनी दुर्गम पर्वतराजित उड्या मारल्या.
पहिली उडी मारली ती एक्कावन वर्षीय सिनियर कॊलोनेल ली झेनाबो यांनी.
खचलेली जमीन व खराब हवामान यामुळे जेव्हा हवाई मदत करणे अवघड झाले तेव्हा ५७ वर्षीय मेजर जनरल सिया गुओफ़ु यांच्या नेतृत्वाखाली ६०० जवान व वैद्यकीय मदतनीसांची टीम चालत निघाली.सिचुआन लष्करी विभागाचे मुख्य कमांडर जड ओझे घेऊन २१ तासांची पायपीट करुन पोहोचले.भुकंपाच्या केंद्रबिंदुपाशी पोहोचणारी ही पहिली तुकडी होती.


खचलेल्या रस्त्यांमुळे अवजड यन्त्रसामुग्री नेणे अवघड झाले.जवानांना हातानेच ढिगारे उपसून टनावारी कॊक्रीट हलवावे लागले.
लोक हिरिरीने द्रव्यदान करत आहेत.
भुकंपात घर गमावलेल्या सु चाओ याने ५ युआन देणगी दिली.तो म्हणतो,त्याच्यापेक्षा वाईट परीस्थिती असलेले आणखी कितीतरी लोक आहेत.
तीन वर्षीय सॊंग झिनीयींग हिला दोन दिवसांनंतर ढिगायाखालुन बाहेर काढण्यात आले.तीने एक पाय गमावला असला तरी तिच्या जिवाला काही धोका नाही.दुर्दैवाने तिचे पालक मात्र वाचू शकले नाहीत.
अकरा वर्षांचा झांग जिवांग हा आपल्या तीन वर्षांच्या झांग हान या बहिणीला घेऊन भुकंपाच्या केन्द्रबिंदुजवळुन बारा तास चालत आला.
ह्या चार पाच महिन्यांच्या बाळाला चोवीस तासांनी बाहेर काढण्यात आले.त्याच्या अंगावर साधा ओरखडाही नव्हता हा चमत्कारच.
Wednesday, May 28, 2008
घाशीराम कोतवाल : कथानक
घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकरलिखीत नाटकाचे कथानक खाली थोडक्यात दिले आहे.
घाशीराम हा कनोजी ब्राह्मण.तो गुलाबी नावाच्या एका बाईच्या तमाशाच्या फडात काम करत असतो.एकदा नाना फडणवीस हे ह्या गुलाबीला भेटायला आले असताना ते घाशीरामच्या अदबशीर वागणुकीवर खुष होऊन त्याला गळ्यातला मोत्याचा हार बक्षीस देतात. नाना निघुन गेल्यानंतर गुलाबी घाशीरामकडे त्या हाराची मागणी करते. घाशीराम नकार देतो.गुलाबी तो हार जबरद्स्तीने हस्तगत करते व घाशीरामला हाकलवुन लावते.घाशीराम ब्राह्मण असल्याने दुसया दिवशी पेशव्यांच्या रमण्यात भोजन व दक्षिणेसाठी जातो.तेथे पुण्याचे ब्राह्मण त्याच्यावर चोरीचा आळ घेतात. त्याला हद्दपार केले जाते.
अपमानीत घाशीराम सुडाची प्रतिज्ञा करतो.गावी जाऊन आपली रुपसुंदर मुलगी ललितागौरी हिला घेऊन परत पुण्यात येतो.
नानांकडे गणपती बसलेले असताना गौरी त्यांच्या वाड्यावर दर्शनासाठी जाते. विवाहीत व वयाने प्रौढ असलेले नाना तिच्यावर लुब्ध होतात.त्यांना गौरीशिवाय काही सुचेनासे होते.
घाशीराम गौरीच्या बदल्यात नानांकडे पुण्याचे कोतवालपद मागतो.मनातल्या मनात काही गणिते करुन नाना घाशीरामला पुण्याचा कोतवाल करतात.घाशीरामाचा पुण्यावरील अंमल सुरु होतो.तो पुणेकरांवर अनेक जाचक नियम लादतो.प्रेत जाळण्यापासुन सर्व गोष्टींसाठी परवानापध्दत लागू करतो.रात्री अपरात्री घरांच्या झडत्या घेतल्या जातात.पुणेकर जनता नुसती संत्रस्त होऊन जाते.
नाना ललितागौरीमधे मश्गुल असतात.कोतवालाविरुध्दच्या तक्रारींची ते अजिबात दखल घेत नाहीत.
पुढे ललितागौरीचा एका सुईणीच्या हातुन संशयास्पद मृत्यू होतो.घाशीरामला प्रथम खुप शोक होतो पण हळुहळु तो सावरतो.मुलीच्या म्रृत्युनंतर घाशीराम फारच पिसाटतो.त्याला मनुष्यवधाची चटक लागते.
काही दाक्षिणात्य ब्राह्मण पुण्यात आले असतात.ते कोतवालाच्या घराजवळच्या घराजवळच्या धर्मशाळेत उतरले असतात. ह्या ब्राह्मणांना कोतवालाच्या बागेतली फुले तोडल्याच्या आरोपावरुन कोठडीत डांबले जाते.यातील काही ब्राह्मणांचा कोठडीत गुदमरुन म्रुत्यू होतो.ह्या घटनेनंतर पुण्याचा ब्रह्मवृंद क्रुध्द होतो.जमावाने नानांच्या वाड्यावर जातो व कोतवालाच्या वधाचे फ़र्मान काढण्याची मागणी करतो.नाना आनंदाने फ़र्मान काढतात.कोतवालाची विटंबना करुन त्याला ठार मारण्याचे आदेश देतात.
कोतवालाची धिंड काढून त्याला दगडाने ठेचून ठार मारले जाते.त्याच्या म्रृतदेहावर अंत्यसंस्कारही केले जात नाहीत.नाना पुण्यात तीन दिवस उत्सव साजरा केला जावा असे सांगतात आणि नाटक संपते.
घाशीराम हा कनोजी ब्राह्मण.तो गुलाबी नावाच्या एका बाईच्या तमाशाच्या फडात काम करत असतो.एकदा नाना फडणवीस हे ह्या गुलाबीला भेटायला आले असताना ते घाशीरामच्या अदबशीर वागणुकीवर खुष होऊन त्याला गळ्यातला मोत्याचा हार बक्षीस देतात. नाना निघुन गेल्यानंतर गुलाबी घाशीरामकडे त्या हाराची मागणी करते. घाशीराम नकार देतो.गुलाबी तो हार जबरद्स्तीने हस्तगत करते व घाशीरामला हाकलवुन लावते.घाशीराम ब्राह्मण असल्याने दुसया दिवशी पेशव्यांच्या रमण्यात भोजन व दक्षिणेसाठी जातो.तेथे पुण्याचे ब्राह्मण त्याच्यावर चोरीचा आळ घेतात. त्याला हद्दपार केले जाते.
अपमानीत घाशीराम सुडाची प्रतिज्ञा करतो.गावी जाऊन आपली रुपसुंदर मुलगी ललितागौरी हिला घेऊन परत पुण्यात येतो.
नानांकडे गणपती बसलेले असताना गौरी त्यांच्या वाड्यावर दर्शनासाठी जाते. विवाहीत व वयाने प्रौढ असलेले नाना तिच्यावर लुब्ध होतात.त्यांना गौरीशिवाय काही सुचेनासे होते.
घाशीराम गौरीच्या बदल्यात नानांकडे पुण्याचे कोतवालपद मागतो.मनातल्या मनात काही गणिते करुन नाना घाशीरामला पुण्याचा कोतवाल करतात.घाशीरामाचा पुण्यावरील अंमल सुरु होतो.तो पुणेकरांवर अनेक जाचक नियम लादतो.प्रेत जाळण्यापासुन सर्व गोष्टींसाठी परवानापध्दत लागू करतो.रात्री अपरात्री घरांच्या झडत्या घेतल्या जातात.पुणेकर जनता नुसती संत्रस्त होऊन जाते.
नाना ललितागौरीमधे मश्गुल असतात.कोतवालाविरुध्दच्या तक्रारींची ते अजिबात दखल घेत नाहीत.
पुढे ललितागौरीचा एका सुईणीच्या हातुन संशयास्पद मृत्यू होतो.घाशीरामला प्रथम खुप शोक होतो पण हळुहळु तो सावरतो.मुलीच्या म्रृत्युनंतर घाशीराम फारच पिसाटतो.त्याला मनुष्यवधाची चटक लागते.
काही दाक्षिणात्य ब्राह्मण पुण्यात आले असतात.ते कोतवालाच्या घराजवळच्या घराजवळच्या धर्मशाळेत उतरले असतात. ह्या ब्राह्मणांना कोतवालाच्या बागेतली फुले तोडल्याच्या आरोपावरुन कोठडीत डांबले जाते.यातील काही ब्राह्मणांचा कोठडीत गुदमरुन म्रुत्यू होतो.ह्या घटनेनंतर पुण्याचा ब्रह्मवृंद क्रुध्द होतो.जमावाने नानांच्या वाड्यावर जातो व कोतवालाच्या वधाचे फ़र्मान काढण्याची मागणी करतो.नाना आनंदाने फ़र्मान काढतात.कोतवालाची विटंबना करुन त्याला ठार मारण्याचे आदेश देतात.
कोतवालाची धिंड काढून त्याला दगडाने ठेचून ठार मारले जाते.त्याच्या म्रृतदेहावर अंत्यसंस्कारही केले जात नाहीत.नाना पुण्यात तीन दिवस उत्सव साजरा केला जावा असे सांगतात आणि नाटक संपते.
Sunday, May 25, 2008
वायकॊपी
तुम्ही मित्राकडून तुमच्या आवडत्या एम्पीथ्री फ़ाइल्सने खचाखच भरलेली एखादी सीडी आणता.
किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा बॊस किंवा सहकारी तुम्हाला उपयुक्त प्रोग्राम्सने भरलेली एखादी सीडी देतो
किंवा तुमच्याकडे एखादी करप्ट झालेली हार्ड डिस्क आहे.
आणि या सीडी किंवा हार्ड डिस्क वरच्या फ़ाइल्स तुम्हाला तुमच्या system वर कॊपी करावयाच्या आहेत.
तुम्ही कॊपी करायला सुरुवात करता.पहील्या काही फ़ाइल्स व्यवस्थित कॊपी कॊपी होतात.
आणि मग.........
काहीतरी अनाकलनीय मेसेज स्क्रीन वर येउन कॊपी होणे थांबते.बरं तर बरं,किती फ़ाइल्स कॊपी झाल्या,किती व्हावयाच्या
आहेत याचाही काही पत्ता लागत नाही आणि मग डोके आपटुन घेण्यापलीकडे तुमच्याकडे काही पर्याय रहात नाही.
तुमच्यावर वारंवार अशी वेळ येत असल्यास... "वायकॊपी" हा प्रोग्राम खास तुमच्यासाठी बनवला गेला आहे.
हा एक छोटासा प्रोग्राम आहे.ह्या प्रोग्रामद्वारा फ़ाइल्स कॊपी करताना ज्या फ़ाइल्स काही कारणाने कॊपी होऊ शकत नाहीत त्यांची नावे एका लॊग मधे घालुन प्रोग्राम तेथेच न थांबता पुढे जातो आणि शेवटी तुम्हाला कॊपी न होऊ शकलेल्या फ़ाइल्सच्या नावांचा एक लॊग मिळतो जो तुम्ही प्रिंट करु शकता वा सेव्ह करु शकता.
http://www.ruahine.com/ येथुन तुम्हाला हा उपयुक्त प्रोग्राम डाउनलोड करता येइल.तुमची इच्छा आणि ऐपत असल्यास तुम्ही हा प्रोग्राम बनविणायाला काही रक्कम तुम्ही डोनेट्सुध्दा करु शकता.मात्र ते ऐच्छीक असुन हा प्रोग्राम वापरण्यासाठी तुम्हाला काहीही शुल्क द्यावे लागत नाही.
किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा बॊस किंवा सहकारी तुम्हाला उपयुक्त प्रोग्राम्सने भरलेली एखादी सीडी देतो
किंवा तुमच्याकडे एखादी करप्ट झालेली हार्ड डिस्क आहे.
आणि या सीडी किंवा हार्ड डिस्क वरच्या फ़ाइल्स तुम्हाला तुमच्या system वर कॊपी करावयाच्या आहेत.
तुम्ही कॊपी करायला सुरुवात करता.पहील्या काही फ़ाइल्स व्यवस्थित कॊपी कॊपी होतात.
आणि मग.........
काहीतरी अनाकलनीय मेसेज स्क्रीन वर येउन कॊपी होणे थांबते.बरं तर बरं,किती फ़ाइल्स कॊपी झाल्या,किती व्हावयाच्या
आहेत याचाही काही पत्ता लागत नाही आणि मग डोके आपटुन घेण्यापलीकडे तुमच्याकडे काही पर्याय रहात नाही.
तुमच्यावर वारंवार अशी वेळ येत असल्यास... "वायकॊपी" हा प्रोग्राम खास तुमच्यासाठी बनवला गेला आहे.
हा एक छोटासा प्रोग्राम आहे.ह्या प्रोग्रामद्वारा फ़ाइल्स कॊपी करताना ज्या फ़ाइल्स काही कारणाने कॊपी होऊ शकत नाहीत त्यांची नावे एका लॊग मधे घालुन प्रोग्राम तेथेच न थांबता पुढे जातो आणि शेवटी तुम्हाला कॊपी न होऊ शकलेल्या फ़ाइल्सच्या नावांचा एक लॊग मिळतो जो तुम्ही प्रिंट करु शकता वा सेव्ह करु शकता.
http://www.ruahine.com/ येथुन तुम्हाला हा उपयुक्त प्रोग्राम डाउनलोड करता येइल.तुमची इच्छा आणि ऐपत असल्यास तुम्ही हा प्रोग्राम बनविणायाला काही रक्कम तुम्ही डोनेट्सुध्दा करु शकता.मात्र ते ऐच्छीक असुन हा प्रोग्राम वापरण्यासाठी तुम्हाला काहीही शुल्क द्यावे लागत नाही.
Subscribe to:
Posts (Atom)